तासगावच्या गणपती मंदिरातील रथोत्सवाला २४१ वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणेशाचे दीड दिवसात विसर्जन होते. मंदिरातून बाहेर पडणारी मूर्ती लाकडाच्या मोठ्या रथातून काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत भाविकांकडून ओढली जाते. भाविकांचा प्रचंड उत्साह, गणपती बाप्पाचा जयघोष, गुलाल, खोबरे आणि पेढ्यांची उधळण यासह ढोल-ताशांच्या गजरात होणारा रथोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र, यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने रथोत्सव रद्द केला आहे. रविवारी दुपारी पटवर्धन वाड्यातून छबिना बाहेर पडला. मंदिरात श्रींची पूजा झाल्यानंतर संस्थानचे श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन यांच्यासह सर्व मानक-यांच्या उपस्थितीत मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर जिपपर्यंत आणण्यात आली. जिपमध्ये उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी मोजक्या मानकऱ्यांसमवेत जिप श्री काशीविशेश्वेर मंदिरापर्यंत पोहोचली. याठिकाणी पूजा करून पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. विसर्जनासाठी वापरलेल्या जिपच्या सभोवती पोलिस तैनात होते, यामुळे भाविकांना लांबूनच श्रींचे दर्शन घ्यावे लागले. दरम्यान, सांगलीतही दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
तिसऱ्यांदा रद्द झाला रथोत्सव
तासगावच्या गणपती मंदिरातील रथोत्सवाला २४१ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेत तीन वेळा रथोत्सव रद्द झाला. १९४२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने रथोत्सवाला परवानगी नाकारल्याने तो होऊ शकला नाही. १९७२ मध्ये भीषण दुष्काळामुळे रथोत्सव रद्द करावा लागला. यंदा करोना संसर्गामुळे रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.