प्रवासी, जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती किंवा व्यापाऱ्यांना करोनाची लक्षणे नसतील, तर चाचण्या करू नका, अशा नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. बऱ्याच जिल्ह्यांत एकाच रुग्णाच्या दोन-तीन चाचण्या केल्या जातात. परिणामी चाचण्यांवरील ताण आणि सरकारवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रत्येक व्यक्तीची प्रोटोकॉलप्रमाणे चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करू नये, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.करोना चाचण्यांच्या विविध पद्धतींनुसार, चाचणी आवश्यक असलेल्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. उपचारासाठी चाचणी आवश्यक असलेल्या व्यक्तींची अँटिजेन चाचणी करण्यात यावी, जेणेकरून रुग्णांच्या उपचाराबाबत अर्ध्या तासात निर्णय घेणे शक्य होईल. अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आलेले; पण लक्षणे असणारे रुग्ण, करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती आणि परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, अशा सूचना आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.