धुळे: मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर झालेल्या पळासनेर गावाजवळच्या अपघातात १० जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात २७ जण जखमी झाले. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारा कंटेनर ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित होऊन एका हॉटेलमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात घडला.
नाश्त्यासाठी उतरला, क्षणात होत्याचं नव्हतं, रोजीरोटीचं साधनच हिरावलं; धुळ्याच्या अपघातात सागरचं सारंच गेलं
यादरम्यान कंटेनरने २ वाहनांना धडक दिली. या अपघातात आपली जवळची माणसं गमावलेल्या लोकांनी घटनेनंतर एकच आक्रोश केला. मात्र या सगळ्यात एका चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हा झालेला अपघात इतका भीषण होता की, मजुर अक्षरश: चिरडले गेले. रस्त्यावर रक्ताचा पाट वहात होता. आपली काही चूक नसतानाही १० जणांचा बळी गेला आहे, तर २७ जण जखमी झाले आहे. पळसनेरजवळ असलेल्या कोळशापाणी पाड्यावर या अपघातानंतर मोठा आक्रोश होता. या सगळ्यात एका चिमुकलीचे हुंदके मात्र मन हेलावून टाकणारे होते.

कोकणात अपघात प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची धडक, १३ प्रवासी जखमी

सात वर्षांची चिमुकली एकटीच घराबाहेरच्या भिंतीला डोकं लावून रडत बसली होती. तिला आधार देणारं ना घरात कोणी होतं, ना बाहेर. तिला रडण्याचं कारण विचारलं असता तिने सांगितलं, की आई भावाला सोडायला पळासनेरला गेली होती. तेव्हा हा अपघात झाला. त्यात भावाचा मृत्यू झाला आणि आईही जखमी झाली. ती सध्या दवाखान्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुकलीच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आईच घर सांभाळते आणि मुलांचा सांभाळ करते. अशात या अपघातात तिने वडिलांनंतर भाऊही गमावला. आई नक्की कुठे असेल? अशा विचारांनी या चिमुकलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. या अपघातात अवघ्या २३५ घरांच्या पाड्यातील आतापर्यंत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here