मुंबई: मंत्रिपदासाठी वर्षभरापासून प्रतीक्षा करत असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह थेट सरकारमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची घालमेल वाढली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यानं भाजप, शिवसेना आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं सेना, भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी संध्याकाळी बाचाबाची झाली. दोन आमदार भिडल्याचं समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले.

राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं शिवसेनेत अस्वस्थता आहे. मंगळवारी वर्षावर झालेल्या बैठकीत याचे पडसाद पाहायला मिळाले. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यात झटापटही झाली. आमदारांच्या वादाबद्दल समजताच मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट टाकून मुंबईत परतले. त्यांच्या उपस्थितीत आमदारांची समजूत काढण्यात आली. आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होते.
अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गट सत्तेत आल्याचं शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली आहे. याच चिंतेत असलेल्या आमदारांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार येत्या काही दिवसांत होईल असं शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच दोन आमदार एकमेकांना भिडले. मंत्रिपदांची संख्या वाढवण्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन शिंदेंनी आमदारांना दिलं आहे.

आम्ही आता नाराज होऊन तरी काय करणार; भरत गोगावलेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्तारात गेम?

कोणताच वाद झाला नाही; शिंदेसेनेचा इन्कार
शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणताही वाद, बाचाबाची झाली नसल्याचं प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितलं. आमदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा कपोकल्पित आहे. त्यात कोणतंच तथ्य नाही. शिवसेना आमदार, खासदारांची बैठक झाली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. दर महिन्याला अशी बैठक होत असते. बैठक वर्षावर संपन्न झाली. पण त्यात कोणतीही बाचाबाची किंवा वाद झाले नाहीत, असं म्हणत म्हस्केंनी वृत्ताचं खंडन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here