अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकर पलटी होऊन त्याला आग लागली. यामध्ये टँकरमधून प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या एका महिलेस दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी हा अघात झाला.

टँकरचा सहचालक गणेश रामराव पालवे (वय ४२ रा. पालेवाडी) व सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव, ता.पाथर्डी) या दोघांचा मृत्य झाला. तर लहू सांडू पवार (वय ५३), सुमन लहू पवार (वय ४९), जगदीश जगन पवार (वय ३) कोमल जगन पवार (वय ७ रा. विसरवाडी ता. पैठण) हे जखमी झाले आहेत. मुख्य चालक दादासाहेब केकान याने अपघात होताच उडी मरली. तो किरकोळ जखमी असून अपघातस्थळावरून निघून जाऊन तो थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.

मुसळधार पावसामुळे ३५ शेतकरी पुरात अडकले; प्रशासनाने हुशारी दाखवत सर्वांचा जीव वाचवला
इथेनॉल घेऊन जाणारा हा टँकर माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर उलटूला. त्यानंतर त्याला आग लागली. हे दृष्य पाहून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. अग्निशामक दलालाही बोलावण्यात आली. टँकरमधील पाच जणांना बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. मात्र, सहचालक गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोघे टँकरमध्ये अडकल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. गणेश पालवे टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला. त्याचा चेहरा वगळता शरीर आगीमध्ये जळाले. तर महिला संपूर्ण भाजून मृत्यूमुखी पडली.

अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना
जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस हवालदार नितीन दराडे,राम सोनवणे,अल्ताफ शेख,सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने टँकरची आटोक्यात आणून आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून नावे निष्पन्न केली.

अचानक आग लागली, लोकं झोपेत होते; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंनी सांगितलं भीषण अपघाताचं नेमकं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here