कोल्हापूर : मी काहीच केलं नाही. फक्त वेगवेगळ्या रुपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंगे पकडली, असा पलटवार ग्रामविकास मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर केला आहे. राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी मुश्रीफ वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे “आ बैल मुझे मार” व निष्ठा दाखवण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर मुश्रीफ यांनी ही टीका केली आहे.

निष्ठा दाखवण्यासाठी मला केविलवाणी धडपड करावी लागते, ही टीका हास्यास्पद आहे. सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

मी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारे विधान कधीच केले नव्हते. पहिल्यांदा अर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषधामुळे लोकांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. या आयुष्य मंत्रालयाच्या शासन निर्णयाप्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला व खरेदी प्रक्रिया सुरू केली. अपेक्षित दर न आल्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर घ्यावा, असे आदेश काढल्यानंतर १५ दिवसांनी माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत, असे विधान केले होते, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

५ व्या वित्त आयोगाचा निधी ८०% ग्रामपंचायत, १०% जि.प. व १०% पंचायत समिती यांना देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्याप्रमाणे निधीचे वाटप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांनी माझा सत्कार केला होता. त्यास उद्देशून पाटील यांनी हा तर केंद्र शासनाचा निर्णय असून मुश्रीफ हार कसे घालून घेत आहेत? असे कुत्सित विधान केले होते. मी वरील दोन्ही गोष्टीवरून त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती व माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी बदनामीचा दावा दाखल करण्याचे सांगितले होते. तसे पुरावेही त्यांच्याकडे पाठवले होते. अद्याप त्यावर त्यांचे उत्तर नाही की, माफीही मागितली नाही. तसेच दोन रुपयाला अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून द्याव्यात, असे आवाहन केले होते. यावरही त्यांचे उत्तर नाही, असं त्यांनी सांगितलं.

एक दिवस अचानक त्यांनी मला व सतेज पाटील यांना पत्र पाठवून त्यांच्यावर न केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन करोना काळामध्ये आपण किती मदत केली (प्रचंड माया असल्यामुळे), त्यांची उदाहरणे देऊन आम्हाला आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले होते. त्यावर उत्तर देताना पाटील यांचे दोन चेहरे कसे आहेत, याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले होते, असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here