पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उपनेत्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. पक्षात सटरफटर लोक आल्यानं आम्ही नाराज नाही, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी आता नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक, जातीचा असलेला अहंकार यांचा पाढाच अंधारे यांनी वाचला आहे. इतकंच काय तर २०१८ साली आपला शिवसेना प्रवेश देखील नीलम गोऱ्हे यांनीच रोखल्याचं अंधारे म्हणाल्या. तर, आपला ठाकरे गटात झालेला प्रवेशही नीलमताईंना खटकला असल्याचं अंधारे यांनी म्हणाल्या.सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट(अ) प्रिय ताई, काही माणसं पदामुळे मोठी होतात. काही पदं माणसांमुळे मोठी होतात पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठे होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या. तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं, एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातुरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्यांपूर्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, नीलम ताईने मला प्रेसमध्ये बसू दिलं नाही. अपमानित केलं. तर पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिलं नाही. तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर वॉशरूम वापरण्यास मज्जाव केला. असे गंभीर आरोप अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केले आहेत. शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांच्या एका प्रदर्शनात उद्घाटनाला गेल्यावर हातात कात्री देतो का म्हणून त्याला डाफरून डाफरून बोललात. अमरावतीची पोलिस पत्नी वर्षा भोयरने तुम्हाला मदत मागितली पण जात बघून इग्नोर केले. तुमच्या स्वश्रेष्ठत्व अन् अहंकाराचे अनेक किस्से म्हटलं तर वरवर खूप साधारण वाटणारे पण म्हटलं तर जातश्रेष्ठत्वाने पछाडलेले आहेत. भांडवली व्यवस्थेच्या विरुध्द विचार मांडता मांडता तुम्ही स्वतःच त्या व्यवस्थेचा भाग कधी झालात हे तुम्हालाच कळले नाही, असा निशाणा अंधारे म्हणाल्यात. दरम्यान, स्त्री आधार केंद्राचा गवगवा करत अनेक पदं, पुरस्कार अन् माया जमा करणाऱ्या तुम्ही खेळाडू महिलांबद्दल अवाक्षरही बोलला नाहीत. ना कृषी कायदा आंदोलनात चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दल ब्र शब्द काढला. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणायची..!दुसरीकडे, तुम्हाला आठवतं का जाधवर ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थी संसद कार्यक्रमात २०१८ साली मी आपल्याला भेटून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कार्यक्रमात खडसे साहेबही होते. तेव्हा आपण तो विषय झुरळासारखा झटकून दिला होता. तेव्हाही आपला अहंकार आणि जातश्रेष्ठत्व वाद मला कळायला हवा होता. पण मग पुढे अनेक लोक भेटत राहीले. सागर माळकर, मदन गाडे, कितीतरी. अगदी मागील वर्षीही माझा प्रवेश तुम्हाला अजिबात आवडला नव्हता. अन् हे माझ्याही आधी सन्मानिय वरिष्ठांनी हेरले होते. म्हणूनच प्रवेशाच्या दिवशीच तुमचा उल्लेख त्यांनी ‘खाष्ट सासू” असा केला, असं म्हणत अंधारे यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. तुम्ही माझा द्वेष करताना त्याची कारणं जातीय अधिक होती. सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलगी स्वकर्तृत्वाने ऊभी राहणे तुम्हाला न मानवणारे होते. तुम्हाला राजकीय जन्म प्रकाश आंबेडकरांनी दिला पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्याचा ही विसर पडला. कालचा तुम्ही केलेला उल्लेख ही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता. तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देवू शकता ना कुणाचा उत्कर्ष बघू शकता ना उपकारकर्त्याची जाणीव ठेवू शकता…तुम्ही राहता त्या मॉडेल कॉलनी, शिवाजीनगरमध्ये ना साधी एक शाखा काढू शकलात ना, एखादा नगरसेवक निवडून आणू शकलात. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला. पण कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्रीसोबत निकराची झुंज देत आहेत. अन् तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळ कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here