चित्रकूट: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतापूरमध्ये एका वयोवृद्धाची चाकूने भोसकून केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा मुलगा आणि अन्य एका साथीदाराला अटक केली आहे. संपत्तीत वाटा दिला नाही म्हणून मुलाने साडूच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कौशांबी जिल्ह्यातील बरियावा गावातील अर्जुनलाल दिवाकर आपल्या मुलाच्या त्रासाला कंटाळून चित्रकूटच्या सीतापूरमध्ये आपल्या नातीच्या सासरी येऊन राहत होते. १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा राजकुमार आपला साडू शैलेश चौधरी आणि अन्य एक साथीदार यांच्यासोबत दुचाकीवरून आला. चित्रकूटमध्ये आल्यानंतर पहाटे पाच वाजता त्यांनी टेरेसवर झोपलेले अर्जुनलाल यांच्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

शेजारील लोकांनी अर्जुनलाल यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना वाचवण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यांना पाहून हल्लेखोर दुचाकी तिथेच सोडून पसार झाले. दुचाकीच्या क्रमांकावरून ती कोणाच्या नावावर आहे याची माहिती घेतली असता, अर्जुनलाल यांच्या मुलाची असल्याचे कळले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. आरोपी राजकुमार आणि त्याच्या नातेवाइकाला पोलिसांनी अटक केली. अपर पोलीस अधीक्षक प्रकाश स्वरूप पांडेय यांनी सांगितले की, संपत्तीवरून त्यांच्यात वाद सुरू होते. संपत्तीत वाटा दिला नाही म्हणून मुलाने आपल्या साडूच्या मदतीने त्यांची हत्या केली. दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here