म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : गेले अनेक वर्षे कोल्हापूरकर ज्या पाण्याची वाट पहात होते, ते काळम्मावाडी धरणातील पाणी थेट पाईपलाईनद्वारे पुढच्या महिन्यात शहरात पोहोचणार आहे. धरणाच्या खाली असलेल्या जॅकवेल पर्यंत पाणी पोहोचल्यानंतर त्याचे पूजन करण्यात आले, तेव्हा या योजनेसाठी आपली आमदारकी पणाला लावलेल्या सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याचा विषय गेले ४० वर्षे चर्चेत होता. विधानसभा लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्ष आणि नेते याबाबत आश्वासन देत होते. पण प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होत नव्हती. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी आपली आमदारकी पणाला लावली. योजना मंजूर न झाल्यास विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आणि या योजनेला प्रत्यक्ष स्वरूप येण्यास सुरुवात झाली.

पाय घसरुन नदीत बुडाले, पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी प्रयत्नांची शिकस्त केली, पाण्याबाहेरही काढलं पण….
त्यावेळी केंद्रातून, राज्यातून त्यांनी योजनेला मान्यता आणली खरी, पण त्यानंतर राज्य सरकारमध्ये कॉंग्रेसची सत्ता गेल्याने इतर परवान्यांच्या फेऱ्यात ही योजना अडकली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचं काम आता पूर्णत्वास आले आहे. येत्या दोन महिन्यात योजना कार्यन्वित होईल.

खाली आईवडील गप्पा मारत होते, धीरज वरच्या मजल्यावर गेला अन् नको ते करुन बसला, कुटुंबाने हंबरडा फोडला
आज काळम्मावाडी धरण योजनेच्या ठिकाणी जाऊन आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी जाऊन जलपूजन केले. यावेळी कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईप लाईन योजनेची स्वप्नपूर्ती झाल्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी माजी नगरसेवक सारंगधर देशमुख, राजू लाटकर, मधुकर रामाने, संदीप नेजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here