म. टा. प्रतिनिधी, : शेतीच्या वादातून भाऊबंदकी उफाळून आली. शेताचा बांध कोरल्यावरून भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून दोघा भावांनी मोठ्या भावाच्या डोक्यात फावड्याने प्रहार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना येथे रविवारी सायकांळी साडेपाच वाजता घडली. दगडू महारू अहिरे (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दस्केबर्डी येथील दगडू अहिरे यांचा रविवारी सायंकाळी जामदा शिवारातील भवाळी रस्त्यालगत कपाशीच्या शेतावरील बांधावर मृतदेह सापडला होता. जामदा शिवारात दगडू अहिरे यांची शेती असून, शेजारी लहान भाऊ चक्रधर महारू अहिरे याचे शेत आहे. दोघा भावांच्या शेताचा बांध एकच असून, त्यावरून दोघा भावांमध्ये कायम भांडण होत होती. अहिरे यांचा आणखी एक भाऊ राजाराम अहिरे हा नेहमी यावरून चिथावणी देत असतो.

२३ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजताच्या सुमारास दगडू अहिरे हे नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात गेले. पाठोपाठ मुलगा, सून असे शेतात गेले. दगडू अहिरे हे शेताच्या बांधावर गवत काढत होते. मुलगा आणि सून दुपारी घरी परतल्यानतंर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दगडू अहिरे यांचा मुलगा मच्छिंद्र अहिरे हे नातेवाईकांसह शेतात गेले असता वडील दगडू अहिरे हे मृतावस्थेत आढळून आले. काका चक्रधर अहिरे यांनीच राजाराम अहिरे यांच्या चिथावणीवरुन फावड्याने वडील दगडू अहिरे यांच्या डोक्यावर वार करून ठार मारले, असे तक्रारीत मच्छिंद्र अहिरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात चक्रधर महारू अहिरे व राजाराम महारू अहीरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही हे करीत आहेत. घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. हत्या केल्याप्रकरणी अन्य दोघा सख्ख्या संशयित भावांना रात्रीच पोलीसांनी ताब्यात घेतले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here