दरम्यान, सध्या नगरमधील अमरधाम येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे शिवसेना व मनविसेने महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू केले आहेत. त्यातच महापौर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निधी मागितल्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महापौर वाकळे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधीची मागणी करणारे पत्रच दिले आहे. नगर शहरात करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी तीन कोविड सेंटर सुरू केले आहेत. तसेच, आणखी कोविड सेंटर सुरू करायचे असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
सध्या महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहे. त्यामुळे सरकारकडून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जो निधी प्राप्त झाला आहे, त्यामधून नगर महापालिकेला दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होईल, असेही या पत्रात स्पष्ट केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.