धुळे: शहरात पाणीपुरवठा दररोज करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपकडून निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते. मात्र तरीदेखील शहरात दहा ते बारा दिवसात पाणीपुरवठा होत असून तोदेखील अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांनी हंडा मोर्चा काढून आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी पाण्याचा प्रश्न न सुटल्यास मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
रेल्वेचं नुकसान होतंय की लोकांच्या हितासाठी? का कमी होणार वंदे भारत ट्रेनचे भाडे; जाणून घ्या कारण
या पार्श्वभूमीवर आज आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांनी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने शासनाने जनतेच्या दारी न जाता आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्याना जनतेला पोलिसांच्या दारी आणल्याचा आरोप आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांनी केला आहे. जनतेच्या प्रश्नासाठी होणाऱ्या आंदोलनाची धास्ती घेत मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीला शरण जात आम्हाला ताब्यात घेतल्याचे आनंद लोंढे यांनी सांगितले.

लेक राज्याचा उपमुख्यमंत्री, अजितदादांच्या मातोश्री विठुराया चरणी नतमस्तक

एक दिवसाआड नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन सत्ताधारी भाजपने केले होते. मात्र जनतेच्या अपेक्षा फोल ठरवत धुळे मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजप आपल्या मस्तीत मस्त असल्याचा आरोप गंभीर आरोप आनंद लोंढे यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत समता समाज संघाचे किरण गायकवाड, आरपीआय आठवले गटाच्या नैना दामोदर, अंजना चव्हाण, सोनल मराठे, निलेश जिरे, रोहित सोनवणे, अनिल ठाकरे, विक्की लोंढे, मनोज आहिरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here