रोहित पवार यांनी ट्विट करून कॉलर ट्यूनबाबत नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यापैकी कितीजणांना करोनाची कॉलर ट्यून ऐच्छिक करायला हवी असं वाटतं?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित यांच्या या प्रश्नाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. या कॉलर ट्यूनचा वैताग आलाय. ती काढून टाकली पाहिजे, असं नेटिजन्सनी म्हटलं आहे. काही लोकांनी तर महाराष्ट्रात हिंदीत कॉलर ट्यून हवीच कशाला? असा सवाल केला. त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढण्याची मागणी केली होती. या कॉलर ट्यूनमुळे भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला होता. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी करोना विषाणूबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची विनंती केली होती.
मार्च महिन्यात ही ट्यून सुरू करण्यात आली. आणि आता तर जून महिना आला आहे. ज्यांना ही ट्यून ऐकायची आहे, आणि समजायचे आहे ते आतापर्यंत समजले असतील. आता यापुढेही ही ट्यून सुरू ठेवू नये. ही ट्यून ऐकून आता कान पकले आहेत, असे सिंह यांनी म्हटले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.