नवी दिल्ली : टोमॅटोच्या किमती सध्या गगनाला भिडल्या असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. १५ दिवसांपूर्वी ६० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो मुंबईत आता १५० रुपये किलोच्या पुढे गेला असून टोमॅटोचे भाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर टोमॅटोच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र, सध्या आठवडाभर तरी त्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. टोमॅटोशिवाय कोबी, फ्लॉवर, काकडी, पालेभाज्या आदी भाज्याही महागण्याची शक्यता आहे.

Gold : जगभरातील देशांना त्यांचे सोने परत हवे आहे, जाणून घ्या काय आहे नेमके कारण
अनेक राज्यांमध्ये टोमॅटो २०० रुपये किलोपर्यंत विकला जात असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतीमुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो जवळपास गायब झाला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची काढणी आणि पुरवठा विस्कळीत होत झाला असून टोमॅटोची काढणी थांबली आहे. यासोबतच वाहतुकीच्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो आणि इतर भाज्यांचा पुरवठा होतो, परंतु सध्या देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा पुरवठा कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून केला जात असून टोमॅटोशिवाय कोबी, फ्लॉवर, काकडी, पालेभाज्या आदी भाज्या तेथून पुरवल्या जात आहेत.

कोण आहेत दीपाली गोयंका? ९४०० कोटींची कंपनी, विम्बल्डन स्पर्धेला पुरवते टॉवेल
इतर भाज्यांचे भावही वाढतील
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटोबरोबरच कोबी, फ्लॉवर, काकडी आणि हिरव्या भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. बेंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चचे संचालक एस.के. सिंग यांनी ईटीला सांगितले की, उत्तरेकडील राज्यांमध्ये विशेषत: हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आणि शिमला मिरचीचे बहुतेक उभे पीक नष्ट झाली आहेत. पाणी साचल्यामुळे पीक खराब झाले आहेत. त्यामुळे या भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच किमतीही पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या-रसाळ आंब्यांनी मोठी कमाई, घरोघरी पोहोचवला ब्रँड; ‘यशस्विनी’ नादिया चौहान आहेत कोण?
या हंगामात कोबी, फ्लॉवर आणि शिमला मिरचीचा सर्वाधिक पुरवठा हिमाचल प्रदेशातून होतो. हिमाचलमधून फक्त दिल्लीलाच नाही तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये या भाज्यांचा पुरवठा केला जातो. एस.के.सिंग म्हणाले की, भाज्यांचे भाव वाढल्याने लोक डाळींकडे वळतात. त्यामुळे डाळींचे भाव आणखी वाढू शकतात. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह शेकडो रस्ते बंद झाले आहेत. यामुळे डोंगरावरून मैदानी प्रदेशातील राज्यांमध्ये होणारी फळे आणि भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महामुंबई परिसरात टोमॅटोची किंमत १५ रुपये प्रति किलोवरून विविध क्षेत्रांमध्ये १२० ते १५० रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. आठवडाभरात भाज्यांचे दरही दुपटीने वाढले असून त्यांची विक्री ४०% कमी झाल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक विक्रेत्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here