पुणे: भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक ट्विट करत खळबळ माजवली होती. ‘मर्दानगी वर कलंक ! हिज** प्रमुखांकडून अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!’ अशा शब्दात ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र पुण्यात या टीकेविरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलन करत नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
विरोधात लढले, संघर्ष केला पण कट्टर विरोधकच सत्तेत बसल्याने फडणवीसांच्या सहकाऱ्याची मोठी गोची
मात्र आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला होता. हे करत असताना मोठा गोंधळ त्याठिकाणी निर्माण झाला होता. तृतीयपंथांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कायदेतज्ञ असीम सरोदे आणि सुजात आंबेडकर हे पुण्यातल्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सुजात आंबेडकर आणि असीम सरोदे यांनी पोलिसांची आणि आंदोलनकाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

रोड कॉन्ट्रॅक्टर असलेला व्यक्ती आमदार झाला, अजितदादांच्या बंडाने तालुक्याला ७५ वर्षांनी मंत्री लाभला!

सुजात आंबेडकर म्हणाले की, नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांनी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे. याकरिता आम्ही पोलिसांना देखील संध्याकाळपर्यंतचा वेळ दिलेला आहे. यानंतर पोलिसांचा जो काही निर्णय येईल त्याच्यावर विचारविनिमय करून उद्या आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ठरवू. तृतीयपंथीय बद्दल असं वक्तव्य करणे हे बेकायदेशीर आहे. आर्टिकल १४ चे उल्लंघन आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो. नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबांकडून अनेकदा या कायद्याचे उल्लंघन करण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर १५३A लागू करावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करतो.

या बाबत कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले, हिजडा शब्द वापरला असल्याकारणाने तो तृतीयपंथांचा अपमान होतो. नितेश राणे यांनी ज्या पद्धतीत शब्द उच्चारलेला आहे. तो चांगल्या उद्देशाने उच्चारलेला नाही आहे. शिवी या शब्दात हिजडा शब्द वापरणे अत्यंत चुकीचा आहे. याबाबत तृतीयपंथांना विशेष संरक्षण देणारा कायदा तयार झाला असताना पण तृतीयपंथींबद्दल अनेक राजकीय नेते बेताल वक्तव्य करत असतात.
Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ
याबाबत आता असे वक्तव्य करण्याऱ्यांविरोधात महाराष्ट्रात कायदा करण्याची गरज झाली आहे. याबाबत बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर १५३A चा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे. पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, जिल्हा सरकारी वकिलांकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे प्रकरण पाठवण्यात आले आहे. कशाप्रकारे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे ते सांगणार आहेत. मात्र आम्ही सुद्धा या प्रकरणाचा अभ्यास करून त्यांना सांगणार आहे की, कशा पद्धतीने हा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. याबाबत दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here