बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले की, ‘वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहेत.’ पत्रकाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, रतन सिंह यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी कुटुंबीयांसह धरणे धरले आहेत. एनएच ३१ वर त्यांनी धरणे धरले. फेफना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस ठाण्याचे प्रमुख शशिमौली पांडेय यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.
आझमगढचे पोलीस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. रतन सिंह हे पत्रकार होते. मात्र, या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.
अशी घडली घटना
सोमवारी एका मुलानं रतन सिंह यांना बोलावून घेतले. तिथे अरविंद सिंह आणि दिनेश सिंह यांच्या नातलगांनी रतन सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.