महाडः जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एका वृत्त वाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानं इमारत पूर्णपणे ढासळली असून संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच दिले होते. ()

सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. तर, आत्तापर्यंत १८ रहिवाशांचा शोध सुरु आहे. तर, ७८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक रहिवशांनी या इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनीही कारवाईचे आदेश दिले होते. तर, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनीही या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचं म्हटलं होतं.

महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनीअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी मडाडयेथून पथक रवाना झालं असल्याचं, अशी माहिती समोर येत आहे.

वाचाः

दुर्घटनेला १२ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप बाचवकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली १८ जण असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफच्या तीन पथक घटनास्थळी आहेत.

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here