मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतली आहे. अजित पवार हे सोमवारी दुपारी त्यांच्या गटाच्या ३० आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. कालप्रमाणे आजही अजित पवार आणि अन्य आमदार शरद पवार यांना पूर्वकल्पना न देता याठिकाणी आले होते. शरद पवार यांनी कालप्रमाणेच या सगळ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मात्र, कोणताही कौल किंवा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांपाठोपाठ आमदारांना सोबत घेऊन शरद पवार यांचे मन वळविण्याचा अजितदादांचा डाव तुर्तास तरी अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरुवातीला शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात जवळपास पाऊणतास बैठक झाली. यानंतर अजित पवार यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. शरद पवार यांनी शांतचित्ताने या सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बैठकीत नेमके काय घडले, याचा तपशील सांगितला.

मोठी बातमी: अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, आणखी एका भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आज अजित पवार, विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आम्ही सर्वजण शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. जसं तुम्हाला माहिती आहे, काल दादांच्या नेतृत्वाखाली मंत्री आले होते. काल रविवार असल्याने आमदार मतदारसंघात होते. आज अधिवेशन असल्याने आमदार मुंबईत आहेत. शरद पवार यांचा आशीर्वाद मागण्याची संधी मिळून देण्याच्या निमित्ताने आम्ही आज याठिकाणी आलो. आम्ही माहिती काढली तेव्हा शरद पवार दुपारी यशवंतराव चव्हाण सेंटरला येणार असल्याचे समजले. म्हणून आम्ही इथे आलो. त्यांना भेटून आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतला. काल केली तशीच आजही पक्ष एकसंध राहण्याबाबत विनंती केली. त्यानंतर आता आम्ही परत जात आहोत. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मनात आता काय आहे, हे मी सांगू शकत नाही. आजही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यापलीकडे मला अधिक काही बोलायचे नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

शिवसेनेचे असो वा राष्ट्रवादीचे, फुटलेले लोक अपात्र ठरणार म्हणजे ठरणार, राऊतांचा अधिवेशनादिवशी एल्गार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here