मुंबई: राज्यातील धार्मिकस्थळं सुरू करण्याची मागणी होत असतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही ही मागणी लावून धरली आहे. रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी , , चर्च आणि बुद्धविहारांसह सर्वच धार्मिकस्थळे सुरू करण्याची मागणी केली आहे. आठवले यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आला. त्यात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली. आता करोनापासून बचाव करण्याचे खबरदारी घेण्याचे जनतेचे प्रबोधन झाले असून करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविले जात असल्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात आहे. त्यामुळे आता भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर खुली करावीत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मुस्लिम समाजाच्यावतीने रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन मशीद सुरू करण्याची मागणी केली होती. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस देरासर सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाने आठवले यांना दिली. त्यावर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवित असल्याचे आठवले यांनी आश्वासन दिले. त्यानुसार आठवलेंनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवून सर्व प्रार्थनास्थळे मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here