देशात सध्या जे काही उपक्रम सुरू आहे त्यासाठी आरोग्य मंत्रालय मार्गदर्शक सूचना जारी करतं. जेव्हा शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय होईल तेव्हा त्या एसओपी लागू होईल आणि ती अंमलात आणावी लागेल, असं सचिव भूषण यांनी सांगितलं.
‘३ कोटीहून अधिक चाचण्या घेतल्या’
देशात आतापर्यंत ३ कोटी ६० लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा तीन पट जास्त आहे. देशातील लॅबची संख्याही वाढली आहे. यात खासगी आणि सरकारी दोन्ही प्रयोगशाळा आहेत. ज्यामुळे चाचणीची संख्या वाढली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद दिली.
देशातील एकूण रुग्णांपैकी २२.२ टक्के अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. करोनातून बरे होण्याचे प्रमाण आता ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण १.५८ टक्के आहे, जे जगातील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६, ४०० ने कमी झाली आहे. हे प्रथमच झाले आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.
करोनावरील तीन लशींच्या चाचण्या भारतात सुरू आहेत. सीरम संस्थेच्या लसीचा २ (बी) टप्पा आणि ३ ऱ्या टप्प्याची चाचणी सुरू आहे. भारत बायोटेक आणि झेडस कॅडिला लसीने चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलाराम भार्गव यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.