मुंबई : ‘दोन पत्नी असल्याच्या प्रकरणात पतीच्या निधनानंतर नुकसानभरपाईचे पैसे मिळणार असतील तर त्यावर केवळ पहिल्या पत्नीचा आणि दोन्ही पत्नींच्या मुलामुलींचा हक्क राहू शकतो’, असे प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. महाराष्ट्र रेल्वे पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांचे ३० मे रोजी करोनामुळे निधन झाले. राज्य सरकारच्या जीआरप्रमाणे युद्धात शहीद झाल्याने हातणकर यांच्या कुटुंबाला ६५ लाख रुपयांची भरपाई मिळणार असल्याने त्यांच्या दोन्ही पत्नींकडून दावा केला जात आहे.

दुसऱ्या पत्नीपासून असलेली मुलगी श्रद्धाने भरपाईत वाटा मिळण्यासाठी दावा केला आहे. यासंदर्भात न्या. शाहरुख काथावाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी पतीच्या निधनानंतर केवळ पहिल्या पत्नीचा व तिच्या मुलामुलींचा आणि दुसऱ्या पत्नीपासूनच्या मुलामुलींचा हक्क राहू शकतो, असा निवाडा औरंगाबाद खंडपीठाने पूर्वी दिला असल्याची माहिती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी दिली. त्याविषयी खंडपीठानेही सहमती दर्शवली.

या दाव्यावर निकाल लागेपर्यंत भरपाईची रक्कम न्यायालयात जमा करण्याची तयारी चव्हाण यांनी यावेळी दर्शवली. तेव्हा, ‘सुरेश यांनी दुसरे लग्न केल्याची आम्हाला कल्पना नव्हती’, असा दावा सुरेश यांच्या पहिल्या पत्नी शुभदा व मुलगी सुरभीने सुनावणीदरम्यान केला. तर ‘याविषयी त्यांना कल्पना होती आणि सुरेश यांचे दोन्ही विवाह नोंदणीकृत आहेत’, असा दावा श्रद्धाचे वकील अॅड. प्रेरक शर्मा यांनी केला. त्यामुळे सुरेश यांच्या दुसऱ्या कुटुंबाविषयी कल्पना होती की नव्हती, याविषयी गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याचे निर्देश खंडपीठाने शुभदा व सुरभीला देऊन सुनावणी तहकूब केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here