रायगड : जिल्ह्यात खालापूरजवळ कर्जत तालुक्यात इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली आहे. पावसामुळे इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे उपस्थित आहेत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर २१ जणांवर नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. वाचवण्यात आलेल्या २५ जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी: दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; ५ ते ६ मृतदेह बाहेर काढले, २७ जणांना वाचवलं
इर्शाळवाडीत येथे १२० ते १३० जण दरडीखाली सापडल्याची माहिती मंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये मिळाली आहे. सुरुवातीला ४० ते ५० जण अडकल्याची माहिती होती. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. जवळपास ४० घरं ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची प्राथमिक माहिती आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफसह इतर यंत्रणा सज्ज आहेत.
BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती
घटनास्थळ हे दुर्गम भागात असल्याने आणि पावसामुळे बचावकार्यात काहिसे अडथळे येत आहेत. हवामानाची स्थिती लक्षात घेऊन येथे हेलिकॉप्टर द्वारेही बचावकार्य केलं जाणार आहे. तसेच अद्याप या ठिकाणी अजूनही दरड खाली येण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे मदत कार्य करताना अत्यंत काळजीपूर्वक करावं लागत आहे.

घटनास्थळाच्या परिसरात गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. अतिशय भीषण आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बचावकार्य सुरू झालेलं नव्हतं. अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत मदत आणि बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here