कल्याण : आजोबांच्या कडेवरुन निसटून नाल्यात पडलेल्या बाळाच्या बाबतीत सर्व आशा आता फोल ठरल्या आहेत. कारण एनडीआरएफ अधिकाऱ्यांनी शोध मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ३० तासांचा कालावधी उलटल्यानंतर गुरुवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला होता.

“माझ्या पथकातील २५ जवानांनी बोटीच्या मदतीने नाल्यातील सर्व शक्य जागा शोधून पाहिल्या. मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड जोरदार असल्याने बाळ मिळण्याच्या शक्यता फारच कमी आहेत” असे एनडीआरएफचे निरीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

घर नाही, फक्त मातीच! आई-बाबांना पळताही आलं नाही… दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला काटा आणणारा प्रसंग
एनडीआरएफ टीम, पोलीस पथक आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाच्या पथकाने काल सकाळपासूनच ठाकुर्ली आणि कल्याण खाडी परिसरात बोटीच्या सहाय्यने शोध मोहीम राबवली होती. अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंब्य्रापर्यंत आपल्या शोध मोहिमेची व्याप्ती वाढवली होती. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच पडली.

Ashish Sakharkar : चारवेळा मिस्टर इंडिया, मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचे निधन
दरम्यान, नाल्यात पडलेल्या बाळाच्या कुटुंबीयांनी या घटनेचं खापर रेल्वेवर फोडलं आहे. रुळांवरुन चालताना बाळाची आई योगिताचा पाय घसरला, त्यामुळे तिने बाळाला आजोबांकडे दिलं. पुढे त्यांचाही पाय घसरला आणि त्यांच्या हातातून चिमुकली निसटून नाल्यात पडली, असं त्यांनी सांगितलं.

हात-पाय धुताना तोल गेला, नदीत गटांगळ्या; कपडे धुणाऱ्या महिलांनी पाहिलंही, पण तोपर्यंत…
प्रवासी त्यांच्या इप्सित स्थळी सुरक्षितरित्या पोहचत आहेत की नाही, हे पाहणं रेल्वेची जबाबदारी आहे. मध्येच थांबण्याऐवजी ट्रेन जर एखाद्या स्थानकावर थांबली असती, तर आम्हाला रेल्वे रुळांवरुन चालत जावं लागलं नसतं आणि ही दुर्घटना घडलीच नसती, असा आरोप बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here