मुक्ताईनगर तालुक्यातील या अतिवृष्टीची तसेच मातीचा बंधारा फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेत मुक्ताईनगर गाठलं व या ठिकाणी परिस्थितीची पाहणी करत नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून रावेर यावल व मुक्ताईनगर तालुक्यात सातपुडांच्या पर्वतरांगात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे . त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील कुंड धरण आहे, याठिकाणी धरणाची मुख्य भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी तात्पुरता कच्च्या मातीचा मातीचा बंधारा या ठिकाणी टाकण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे हा मातीचा बंधारा वाहून गेला व त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊन मिळेल त्या मार्गाने पाणी चिंचखेडा यासह सहा गावांमध्ये शिरले.
जसा मार्ग मिळत होता तसे पुण्यात पुराचे पाणी शिरत गेलं यामुळे मोठ्या प्रमाणावर या सहा गावांमधील घरांचे तर नुकसान झालेच मात्र संपूर्ण शेतीची शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरला आहे त्या नागरिकांचे सुरक्षित स्थळे असलेल्या शाळांमध्ये राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या गिरीश महाजनांसमोर मांडल्या
या प्रकाराची माहिती मिळाल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनीही त्यांची कन्या रोहिणी खर्च केले यांच्यासोबत जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नुकसान ग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ मदतीचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. दरम्यान यावी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या गिरीश महाजनांसमोर मांडल्या.
नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यावेळी गिरीश महाजन यांनी तहसीलदार व तलाठी यांना दिले आहेत. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील धरणाचे काम सुरू असून या धरणावर असलेला मातीचा बंधारा फुटल्याने धरणाचे पाणी धरणाखालील गावांमध्ये शिरले असून या गावांना धोका देखील निर्माण झाला आहे मात्र तातडीने या ठिकाणी ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
भोकर नदीला महापूर रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्याचा संपर्क तुटला
सातपुड्यात उगम पावलेल्या भोकर नदीला महापूर आला आहे. भोकर नदी ही गरताड गावाच्या मार्गाने रावेर तालुक्यात प्रवेश करते. तर विटवा गावाजवळ ही नदी तापीला जाऊन मिळते. दरम्यान, या नदीवर पातोंडी आणि पुनगाव येथे दोन पूल आहेत. याच पुलांच्या माध्यमातून रावेर आणि मुक्ताईनगरच्या दरम्यानची प्रमुख वाहतूक चालते. भोकरला आलेल्या महापुरामुळे या दोन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यांमधील संपर्क तुटलेला आहे. दोन्ही पुलांवर दोन्ही बाजूंनी पोलीस बंदोबस्त लाऊन बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत..
हतनूर धरणाचे पुन्हा सर्व ४१ दरवाजे उघडले
मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. हातनुर धरणातून तापी नदी पात्रात १ लाख हजार ८९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे . हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली असून तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.