मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांनी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी लढायचं की त्यांना घाबरून राह्यचं हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल केला. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. यावेळी यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. उद्धवजी, तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगताच, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केलं. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की घाबरून राह्यचं हे ठरवलं पाहिजेत, असंही सांगितलं.

तर, देशातील विरोधी पक्ष कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. मात्र, तेच होताना दिसत नाही, असं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्रसरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केंद्र सरकार केवळ त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पक्षांना मदत करत असून इतर राज्यांना ठेंगा दाखवत असल्याचा आरोपही सोरेन यांनी केला.

या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. येत्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांची थकबाकी मिळावी म्हणून जीएसटी परिषदेवर आणि पर्यायाने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेसने ही बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे. तसेच देशात सक्षम विरोधी पर्याय उभा करण्यासाठीही सोनिया गांधी यांनी मित्र पक्षांना विश्वासात घेण्यास सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here