युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसली आहे. पण आता आयपीएल अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपले तरी वेळापत्रक मात्र अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. वेळापत्रक जाहीर न करण्यासाठी एक मोठे कारण असल्याचे आता पुढे आले आहे.

आयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते. यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचा समावेश होता. या दोन संघांतील सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन केले होते. या दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तीन करोना चाचण्या झाल्या. या तिन्ही चाचण्यांमधील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आयपीएलसाठी ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत आहेत. पहिली गोष्ट तर करोनाचं संकट तर आहेच. पण त्याचबरोबर सर्वात युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरणार आहे. त्यामुळे कडक गर्मी जाणवत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे.

आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबुधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परीणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांना मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहीलेली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता त्यांना बायो-बबल सुरक्षेमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडू आता सराव करू शकतात. युएईमध्ये जास्त उष्मा असल्यामुळे खेळाडूंनी सकाळी आणि संध्याकाळी सराव करायला पसंती दिली आहे. त्यामुळे आता किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू आयपीएलच्या सरावाला लागले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here