नालंदा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं होमटाऊन असलेल्या नालंदा येथून एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. जिथे एक तरुणी प्रियकराच्या प्रेमात आपला नवा संसार सोडून त्यांच्या दारी येऊन पोहोचली. पण, आता त्याच्या दारातून घरात जाण्यासाठी तिला आंदोलनावर बसावं लागलं आहे. हे संपूर्ण प्रकरण नालंदा जिल्ह्यातील बेन भागातील आहे. जिथे एक तरुणी आपला हक्क मिळवण्यासाठी प्रियकराच्या दारात धरणे देऊन बसली आहे.

प्रियकराच्या सांगण्यावरून घर सोडलं

प्रेयसीचे लग्न ३ जून २०२३ रोजी इस्लामपूरमधील मिल्की महुआरी गावातील रहिवासी रोशन कुमारसोबत झाले होते. लग्नानंतर अंजनी कुमारी आपल्या पतीसोबत सासरच्या घरी राहत होती. परंतु, प्रियकर सिंटू कुमारने अंजनी कुमारीला प्रेमाचे आमिष दाखवून आपल्याकडे बोलावले. अंजनी प्रियकराच्या घरी तर पोहोचली पण त्यांनी तिला घरात घेतलं आणि मग कामासाठी सुरतला पळून गेला.

चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला
लग्नानंतरही प्रियकर सिंटू तिच्याशी फोनवर बोलत असे आणि तिला पतीपासून दूर राहण्यासं सांगायचा. गेल्या पाच दिवसांपासून प्रेयसी आपल्या हक्कासाठी प्रियकराच्या घराबाहेर बसून आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रेयसी ज्या ठिकाणी धरणे देत आहे तिथून मंत्री श्रावण कुमार यांचं घरही हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही प्रेयसी न्यायासाठी याचना करत आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू

अंजनी कुमारीकडे आता खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत, असं तिने सांगितलं. स्थानिक युवक मनोज कुमार सांगतात की, गेल्या पाच दिवसांपासून ही महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. प्रियकर आणि मैत्रीण जनकपूर या गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसी सतत सरपंच, पोलीस ठाणे आणि गावकऱ्यांकडे मदतीची याचना करत आहे.

लपून-छपून पहिल्या पत्नीचे रील्स पाहतो, दुसऱ्या पत्नीची सटकली, थेट पतीचं गुप्तांग छाटलं, अन् मग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here