विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण भारताच्या या अव्वल स्थानाला आता धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मातब्बर संघ भारतापेक्षा जास्त पिछाडीवर नाहीत.

वाचा-

बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांवर ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ हळूहळू भारताच्या जवळ येऊ शकतात, असे दिसत आहे. इंग्लंडचा संघ तर लवकर भारताच्या जवळ येईल, असे म्हटले जात आहे.

वाचा-

करोनानंतर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली ती इंग्लंडने. आतापर्यंत इंग्लंड दोन कसोटी मालिका खेळलेली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला २-१ अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने १-० असा विजय मिळवला. जर इग्लंडने पाकिस्तानविरुद्धचे दोन कसोटी सामनेही जिंकले असते तर ते ऑस्ट्रेलियालावर मात करून दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले असते.

वाचा-

सध्याच्या घडीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांच्या खात्यामध्ये २९६ गुण आहेत. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त चार गुणांनी पिछाडीवर आहे आणि त्यांचे २९२ गुण झाले आहेत. त्यामुळे जर इंग्लंडने एक कसोटी मालिका जिंकली तर ते भारतीय संघाच्या अव्वल स्थानाला धक्का पोहोचवू शकतात, असे म्हटले जात आहे.

वाचा-

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या संघाचे किती गुण आहेत पाहाभारत ३६०
ऑस्ट्रेलिया २९६
इंग्लंड २९२
न्यूझीलंड १८०
पाकिस्तान १६६
श्रीलंका ०८०
वेस्ट इंडिज ०४०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here