म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः काही महिने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात करोना संसर्गाचा आकडा आज तब्बल वीस हजारावर पोहोचला. यामुळे कोल्हापूरही करोनाबाबतीत असुरक्षित झाला असून रोज वाढणाऱ्या बधितांच्या संख्येने प्रशासन, आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात करोनाचा फारसा संसर्ग झाला नव्हता. यामुळे हा जिल्हा सुरक्षित मानला जात होता. पण जुलैपासून या जिल्ह्यात करोना संसर्ग प्रचंड वाढू लागला. रोज ५०० पेक्षा अधिक बाधित आढळू लागल्याने जुलै महिन्यात जिल्ह्यातील आकडा पाच हजारांवर पोहोचला होता. ऑगस्टमध्येदेखील हा आकडा कमी झाला नाही. या महिन्यात तब्बल पंधरा हजारावर लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने जिल्ह्यातील आकडा बुधवारी वीस हजारांवर पोहोचला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात वाढत असलेले बाधित आणि उपचार करण्यासाठी असलेली यंत्रणा यामध्ये मोठा फरक आहे. उपचारासाठी अतिशय कमी बेड असल्याने सध्या काही खाजगी दवाखाने, मंगल कार्यालये, वसतिगृहे ताब्यात घेण्यात आलेली आहेत. सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन टँकर उभारण्यात आला आहे. विविध १७४ ठिकाणी बधितांवर उपचार सुरू आहेत. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यवर घरच्या घरीच उपचार करण्यात येत आहेत. वडणगे या गावात हा पॅटर्न अधिक आहे. तोच पॅटर्न इतर काही गावातही सुरु करण्यात आला आहे.

जिल्ह्यात खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनाही करोनाची बाधा झाली आहे. प्रशासकीय पातळीवर संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनही काही ठिकाणी होणारी अनावश्यक होणारी गर्दी आणि इतर काही कारणामुळे संसर्ग रोखणे अशक्य होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने ५८९ बळी घेतले आहेत. आत्तापर्यंत ११२०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी नऊ हजारावर रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता अतिशय कमी असल्याने अनेक जणांचा मृत्यू होत आहे. खाजगी दवाखान्यात उपचार करण्यास नकार दिला जात असल्याने उपचाराअभावी अनेकांचा तडफडून जीव जात आहे. उपचार न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला, मात्र आत्तापर्यंत अशा प्रकारची एकही कारवाई करण्यात आली नाही. खाजगी रुग्णालयात रुग्णांची अक्षरशः लूट सुरू आहे . त्यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने लेखापरीक्षक नेमले आहेत, पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

मुंबई, पुणे व इतर रेडझोन भागातून तीन महिन्यात जवळजवळ तीन लाख नागरिक कोल्हापूरात आले. यांच्यामुळेही करोनाचा संसर्ग वाढला. बाधित वाढतच असल्याने उपचार करायला आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. यामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here