म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘अनेक जणांची हत्या केलेल्या गुन्हेगाराला काय वाटते, याचा विचार आपण कधीच करीत नाही. अपराधी पकडला गेल्यानंतर तो काही बोलत नाही, त्याला त्याच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप आहे किंवा नाही, या संदर्भातही काही कळत नाही. खरं तर समाजाच्या चांगल्या, वाईट बाजू समजून घेण्यासाठी, समाजाचे दोष समजण्यासाठी गुन्हेगारांची बाजू ऐकून घ्यायला हवी,’ अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. ‘गुन्हेगारांची बाजू समजून घेताना त्यांची मानसिकता घडवण्यात आपण समाज म्हणून दोषी आहोत का, याचाही विचार करायला हवा,’ असेही त्यांनी सांगितले.

सत्तरीच्या दशकात पुण्यात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी जक्कल-सुतार यांच्यावर आधारित विवेक वाघ यांनी दिग्दर्शित केलेला ‘जक्कल’ या माहितीपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) करण्यात आले होते. या वेळी मंजुळे बोलत होते. याच कार्यक्रमात या हत्याकांडातील आरोपी मुनव्वर शाह याने लिहिलेल्या ‘येस आय अॅम गिल्टी’ या पुस्तकाच्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. विवेक वाघ, ‘आशय’चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, प्रकाशक शरद गोगटे, जिग्नेश पुरीया आदी या वेळी उपस्थित होते.

सिनेमा राजपालचा, चर्चा स्मृती मानधनाची; दिग्दर्शक ‘प्रियकरा’ने शूटिंगसाठी सांगलीच निवडलं?
‘सध्या क्रिमिनल सायकॉलॉजीचे शास्त्र अधिक प्रगल्भ होत चालले आहे. वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्तीची मानसिकता तपासून पाहता येणे शक्य आहे. अशा काळात आपल्या समाजातले दोष समजून घेण्यासाठी, समाजाला दोषमुक्त करण्यासाठी गुन्हेगारांची मानसिकता समजून घ्यायला हवी. त्यातून काय बदल करायचे, याची जाणीव होऊ शकते. म्हणूनच चाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती देणारे पुस्तक आणि माहितीपटाचा दस्तावेज जतन करणे महत्त्वाचे आहे,’ असे मंजुळे यांनी सांगितले.

विद्यापीठात नाही शिकलात आणि थेट जगण्याला भिडलात तरी तुम्ही पारंगत होता | नागराज मंजुळे

४० वर्षांपूर्वीचा थरार पुन्हा जिवंत

साधारण ४० वर्षांपूर्वी सत्तरीच्या दशकात पुण्याला हादरवून टाकणारे जोशी-अभ्यंकर हत्याकांड घडले. अनेक कट्ट्यांवर या हत्याकांडाच्या चर्चा होत असत. या हत्याकांडातील आरोपींचे मित्र असलेले, त्यांच्यासोबत अनेक क्षण घालवलेल्या व्यक्तींच्या तोंडून हा सगळा थरार दिग्दर्शक विवेक वाघ यांनी रसिकांसमोर आणला आहे. गुरुवारी पुणेकरांनी तो थरार पुन्हा एकदा अनुभवला. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, मुनव्वर शाह आणि शांताराम जगताप हे चारही आरोपी कसे होते, महाविद्यालयीन जीवनात ते काय करायचे आणि ते हत्याकांडापर्यंत कसे गेले, याचा उहापोह या माहितीपटातून करण्यात आला असून, या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सुधीर फडके यांचा बायोपिक, सुनील बर्वे बाबूजींच्या तर हा अभिनेता दिसणार हेडगेवारांच्या भूमिकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here