जुलूस काढण्यास परवानगी दिली तर पुन्हा एका समुदायाला फैलावण्याच्या नावावर निशाण्यावर घेतलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला हे नकोय. लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा कोणताही आदेश देणार नाही असंही न्यायालयानं म्हटलंय.
मुहर्रम जुलूस संपूर्ण देशात ठिकठिकाणी निघेल यासाठी प्रत्येक राज्य सरकारची परवानगी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलंय.
यावर, याचिकाकर्त्यांनी मुहर्रम जुलूस प्रत्येक वर्षी निघतो, असं म्हटलं. यावर, करोना मात्र प्रत्येक वर्षी नसतो, असं प्रत्यूत्तर न्यायालयानं दिलं.
वाचा :
वाचा :
‘… म्हणून जगन्नाथ पुरी यात्रेला मिळाली परवानगी’
न्यायालयात मुहर्रमला परवानगी देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी जगन्नाथपुरी यात्रेचं उदाहरण दिलं. यावर सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना ‘तुम्ही संपूर्ण देशभरात जुलूस काढण्याची परवानगी मागत आहात. एका विशिष्ट जागेवरच होते. इथे एक रथ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. जर एका ठराविक जागेची गोष्ट असतील तर जोखिम लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ शकलो असतो’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.
जगन्नाथ पुरी यात्रेसाठीही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी नाकारली होती. ‘यात्रेची परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत. महामारीच्या काळात असं आयोजन केलं जाऊ शकत नाही’ असं म्हणत परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, पुनर्विचार याचिका दाखल झाल्यानंतर काही अटींसहीत न्यायालयानं यात्रेची परवानगी दिली होती.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.