राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘करोनावर लस तयार करण्याबाबत एक निष्पक्ष आणि समावेशक रणनीती आतापर्यंत असायला पाहिजे होती. मात्र आताही त्याबाबत कोणतेही संकेत नाहीत. भारत सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक आहे.’ खरे तर, राहुल गांधी यांनी आपल्या १४ ऑगस्टच्या एका ट्विटला रिट्विट करत हे लिहिले आहे.
त्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, ‘भारत कोविड -१९ वरील लस उत्पादक देशांपैकी एक असेल. उपलब्धता, परवडणारी आणि योग्य वितरणव्यवस्था तयार करण्यासाठी स्पष्टपणे परिभाषित, सर्वसमावेशक आणि न्याय्य लस तयार करण्याची रणनीती आवश्यक आहे. भारत सरकारने आता हे करायला हवे.
क्लिक करा आणि वाचा-
जगभरातील अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्यात व्यग्र आहेत. रशियाने ही लस बनवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ३३,१०,२३४ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५,७६० नवीन रुग्ण आढळले आहेत. यावेळी १,०२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५,२३,७७१ रूग्ण बरे झाले आहेत आणि ६०,४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७६.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, सकारात्मकतेचा दर ८.१९ टक्के इतका आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times