मुंबई : अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अथक प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर अनेकजण पराभव स्वीकारतात, पण काही मोजकेच आपली वाटचाल सुरू ठेवतात. अशीच कहाणी आहे अमन गुप्ता यांची. इअरफोनपासून हेडफोन्ससह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी कंपनी बोटचे (boAt) नाव तुम्ही ऐकले असेलच. अल्पावधीतच कंपनीच्या उत्पादनांनी देश-विदेशी बाजारात मोठा ठसा उमटवला असून कंपनीच्या उत्पादनांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही घाम फोडला आहे.

अवघ्या ८ वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे बाजारमूल्य आज ९८०० कोटी रुपये झाले. विशेष म्हणजे बोट कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता यांची यशोगाथा त्यांच्या कंपनीच्या यशाइतकीच रंजक आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या क्षेत्रात बोट सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक मानली जाते.

कॉलेज फीसाठी नव्हते पैसे, इंजिनिअरिंग सोडून दोन तरुण बनले कबाडीवाला; वर्षाला १० कोटींची उलाढाल
कोण आहेत अमन गुप्ता
बोटपूर्वी अमन गुप्ता यांनी आणखी पाच उपक्रम सुरू केले होते जे पूर्णपणे अपयशी ठरले, पण अपयशाने खचून न जाता अमन यांनी उद्योजक बनण्याची जिद्द सोडली नाही. परिणामी आज ते भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअप्सपैकी एकाचे मालक आहेत.

बोटचे सह-संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अमन गुप्ता यांचा जन्म १९८४ मध्ये दिल्लीत झाला. एक चार्टर्ड अकाउंटंट अमनने दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आणि केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण त्यांचे लक्ष्य वेगळेच होते.

वाह क्या बात है! घरच्यांचा विरोध पण डगमगला नाही, मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला दिली ग्लोबल चटक
पाच स्टार्टअप फ्लॉप
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमन गुप्ता यांनी सांगितले की, बोट सुरू करण्यापूर्वी त्यांनी एकामागून एक पाच कंपन्या सुरू केल्या, परंतु कोणीही काम टिकले नाही आणि सर्व ठप्प झाले. अमनने सांगितले की त्यांच्यात काहीतरी करण्याचा खूप उत्साह आहे. त्याच उत्साहाने त्यांना काम सुरू ठेवले. व्यवसायाच्या इतर पैलूंकडे त्यांनी क्वचितच लक्ष दिले, त्यामुळेच त्यांना सुरुवातीला यश मिळू शकले नाही.

कोण आहेत विठ्ठल कामत? कूक म्हणून काम, मग मुंबईत उभारले इकोटेल पंचतारांकित हॉटेल
अमन गुप्ता यांनी सांगितले की त्यांनी ३६ व्या वर्षी boAt ची स्थापना केली आणि २३ पासून ते आपल्या वडिलांसोबत काम करत होते. त्यांनी म्हटले की कोणतीही बिझनेस स्कूल कोणालाही काम कसे करावे हे शिकवू शकत नाही. कोणीही त्यांच्या स्वप्नांची साथ सोडू नये, असे अमन गुप्ता म्हणतात आणि उद्योजक बनण्यासाठी हार न मानता पुढे जात राहण्याचा ते प्रत्येक सल्ला देतात.

अमन गुप्ता म्हणतात की, यशस्वी उद्योजक होण्यासाठी लवकर सुरुवात करावी. जर तुम्ही पहिल्यांदा यशस्वी झालात तर चांगले परंतु जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही आणि तुमचा उद्योजक बनण्याचा मानस असेल तर प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, एक दिवस तुम्ही उद्योजक बनाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here