नवी दिल्लीः पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली. पुलवामा हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत. पण दोषींवर कारवाई करण्यास सतत टाळाटाळ करत आहे. आमचं ध्येय फक्त निवेदन देणं नाही तर गुन्हेगारांना कायदा आणि न्यायाच्या कक्षेत आणणं आवश्यक आहे, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

दीड वर्षांच्या तपासानंतर पुलवामा हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दहशतवादी आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आमचं उद्दिष्ट फक्त निवेदनं किंवा सूचना देण्यापूरते मर्यादित नाही’, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली मुंबई हल्ल्याची आठवण

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ही दहशतवादी संघटना आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात आहेत. आरोपी मसूद अझरला पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जात आहे. हे निंदनीय आहे. आम्ही पाकिस्तानला या प्रकरणी पुरेसे पुरावे दिले आहेत. पण पाकिस्तान जबाबदारीपासून पळ काढत आहे. यावेळी परराष्ट्र मंत्रालयानेही मुंबईवरील २००८च्या हल्ल्याची आठवण करून दिली. मुंबई हल्ल्या प्रकरणी पुरावे देऊनही पाकिस्तानने दोषींवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here