खंडवा: मध्य प्रदेशातील खंडवा येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. ओपी जुगतावत यांचा मुलगा डॉ. सागर जुगतावतचा थायलंडमध्ये मृत्यू झाला आहे. सागर हा त्याचा लहान भाऊ आणि इतर ७ मित्रांसह सुट्टीसाठी थायलंडला गेला होता. त्याच्यासोबत आणखी एका मित्राचाही मृत्यू झाला. दोन्ही मित्र पर्यटनस्थळी बुडाले. त्यांचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दोघांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी संध्याकाळची असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा जुगतावत कुटुंबीयांना माहिती मिळाली की त्यांचा मुलगा डॉ. सागर जुगतावत हा टुरिझ्म सिटी फुकेट येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली.

जिममध्ये मैत्री, रस्त्यात संपवलं, मोबाईलमध्ये लपलेलं गुपित, बिल्डरच्या पत्नीच्या हत्येचं गूढ काय?
दरम्यान, सागरसोबत त्याचा मित्र हर्षित वर्मा याचाही मृत्यू झाल्याचं कळालं आहे. मृत सागरसोबत त्याचा भाऊ मयूर जुगतावत आणि सुमारे ७ मित्रही थायलंडला गेले होते. सागर आणि हर्षितसोबत ही दुर्घटना झाली. त्यावेळी अथर्व आणि रुबल राठोड हे मित्रही समुद्रकिनारी पाण्यात खेळत करत होते. यादरम्यान, समुद्रात जोरदार लाटा उसळू लागल्या होत्या, त्यामुळे चौघेही बुडू लागले. या दोघांशिवाय रुबलही लाटांमध्ये अडकला, पण कसातरी तो पोहत समुद्र किनारी आला.

फुकेटच्या समुद्रात या दोघांना बुडताना पाहून एकच गोंधळ उडाला. लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण लाटा इतक्या जोरदार होत्या की त्यांना वाचवता आलं नाही. याची माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर तटरक्षक दलाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढून त्यांची तपासणी केली. तपास आणि ओळखीनंतर तटरक्षक दलाने फुकेट प्रशासनाला माहिती दिली.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

प्रशासनाने दोघांचेही मृतदेह फुकेट रुग्णालयात ठेवले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती भारतीय दूतावासापर्यंत पोहोचली. थायलंडमध्ये कागदोपत्री कारवाई केल्यानंतर डॉ. सागर आणि त्याच्या मित्राचे मृतदेह भारतात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. याठिकाणी दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली आहे. घरात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here