पंढरपूर: राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्वच स्तरातून आवाज उठू लागला असताना येथील विठ्ठल मंदिरातील दर्शनाबाबत एक वेगळी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

वाचा:

राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर येथे विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. ( Updates )

वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. भाजपनेही या मुद्द्यावर राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे तर सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले आहेत. अशावेळी सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चरणांवर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखाद्या करोनाग्रस्त भाविकाने विठुरायाच्या चरणांवर माथा टेकून दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकालाही करोना संसर्गाची भीती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला आहे.

वाचा:

भजन-कीर्तनास परवानगी द्या

संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कुंभारगावकर महाराज, लबडे महाराज, विनायक महाराज गोसावी, रामकृष्ण महाराज यांनी करोनाचे संकट संपेपर्यंत पायावर दर्शनाऐवजी मुखदर्शन सुरू केले तरी चालेल, असे सांगत पायावर सॅनिटायझर मारण्यास विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायात मद्य निषिद्ध असताना अल्कोहोल असलेले सॅनिटायझर देवाच्या पायावर मारणे वारकरी संप्रदायाला अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पंढरपूरचे महत्त्व देवाच्या पायावर दर्शनाने इतर देवस्थानांपेक्षा जास्त असते त्याच दर्शनाचा त्याग करायची मानसिकता संप्रदायाने केली आहे. याचसोबत करोनाच्या संकटकाळात सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी भजन-कीर्तनास परवानगी मिळावी ही आग्रही मागणी वारकरी करीत आहेत.

वाचा:

सरकारच्या सूचनांचे पालन करणार

विठ्ठल मंदिर सुरू करण्याबाबत मंदिर प्रशासन अजूनही साशंक असून सध्या करोनाची वाढती परिस्थिती पाहता मंदिर उघडणे शक्य नसल्याचा सूर आहे. सरकारने आदेश दिले तर मात्र देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार दर्शन व्यवस्था सुरू केली जाईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे इतर काळात रोज १५ ते २० हजार भाविकांना पायावर दर्शन मिळते मात्र सध्याच्या करोनाकाळात सर्व नियम पळून दर्शन द्यायचे झाल्यास कसेबसे एक हजार भाविकांना सोशल डिस्टन्स पाळून दर्शन व्यवस्था करता येईल. यासाठी ऑनलाइन दर्शन व्यवस्थेचा वापर करावा लागेल असे जोशी म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here