गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे सुरू असलेल्या लोहखाणीत झालेल्या अपघातात एका अभियंत्यासह दोन मजूर असे एकूण तिघेजण ठार झाल्याची घटना रविवारी (६ऑगस्ट) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये सोनल रामगिरवार (२६,नागेपल्ली ता.अहेरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण अभियंत्यांचे नाव असून इतर दोन मजुरांची नावे मात्र कळू शकले नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले व खाली उभ्या असलेल्या जीपवर आढळले.

औरंगजेबाच्या २ हिंदू राण्यांना पंडितांनी भ्रष्ट केलं, सतीप्रथा बंद करणारा तो पहिला राजा होता: भालचंद्र नेमाडे
त्यातील एक अभियंता व दोन मजूर असे तिघांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. या घटनेनंतर एटापल्ली येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’
विशेष म्हणजे या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगिरवर यांचं वर्षभरापूर्वीच आष्टी येथील मुलीसोबत विवाह झाला होता. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.एटापल्ली येथील घटना असलेतरी नागेपल्ली येथील तरुण अभियंत्यांसह इतर दोन मजुरांचा मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केले जात आहे.

बाजारात ८०० ते १००० रुपये भाव, ‘जंगली मशरुम’ विक्रीतून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here