वाचा:
देशात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा अनलॉकचा चौथा टप्पा असणार आहे. या टप्प्यात आणखी कोणत्या गोष्टी सुरू होणार आणि काय बंद राहणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं केंद्राने जारी केलेल्या गाइडलाइन्सने मिळाली आहेत. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार पाच महिन्यांनंतर मेट्रोसेवेचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यात मुंबई, दिल्लीसह देशातील ज्या शहरांत मेट्रोसेवा आहे त्या सर्व मेट्रोसेवा येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर मेट्रो धावते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे व कार्यालयांचे जाळे आहे. हजारो नोकरदारांसाठी मेट्रो हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. या सर्वांनाच मेट्रो पूर्ववत झाल्यास मोठा दिलासा मिळेल.
वाचा:
लोकलची प्रतीक्षा कायम
अनलॉक चारमध्ये मुंबईतील उपनगरीय पूर्ववत होईल, अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र केंद्राच्या गाइडलाइन्स पाहता त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. याआधी मध्य रेल्वेने लोकलसेवेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्य सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केल्यास व रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यास लोकल सुरू करण्यास आम्ही तयार आहोत, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले होते. आता लोकलबाबत राज्य सरकार कोणते पाऊल उचलते हे पाहावे लागणार आहे.
वाचा:
महत्त्वाचे…
> २१ सप्टेंबरपासून धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम १०० जणांच्या उपस्थितीत करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याला अनुसरून राज्यात कोणता निर्णय घेतला जातो तेही पाहावे लागणार आहे.
> शाळा, कॉलेज, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्थानं उघडण्यास मध्येही परवानगी नसेल. त्यामुळे तूर्त ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय असणार आहे. सर्वच संस्थांना त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.
> कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी होणार आहे. राज्यात सर्वाधिक कंटेन्मेंट झोन असून या झोनमध्ये असणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सवलत मिळणार नाही.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times