रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. या युवतीचा मृतदेह तीन दिवस पाण्यात राहिल्याने केस शरीरापासून वेगळे होऊ शकतात अशी शक्यता दाट असते असे मत वैद्यकिय तज्ञांनी आपल्या अहवालात दिले आहे. त्यामुळे नीलिमा चव्हाण मृत्यु प्रकरणात कोणताही घातपात झाला नाही असा निष्कर्ष प्रथमदर्शनी समोर येत आहे अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत नीलिमा चव्हाण मृत अवस्थेत आढळल्या. नीलिमा हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नीलिमाच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा (Internal Injuries) दिसून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालामध्ये, डॉक्टरांनी Viscera तपासणी करिता राखीव ठेवला असून लवकरच Viscera तपासणी रीपोर्ट प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे.

Crime News : चहा पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, गुंडाने भर रस्त्यात साथीदारासोबत केलं भयंकर…
शैक्षणिक डीन आणि प्रा. आणि हेड, फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजी, सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, परळ मुंबई यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘डोक्यावरचे केसे आणि भुवयांचे केस गळणे हे मृत्यूचं कारण नसून मृतदेह कुजल्यामुळे असं झालं असावं’ असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत नीलिमा चव्हाणसोबत हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे तिचे वरिष्ठ व सहकारी, बँकेतील नोकरवर्ग, पूर्वी नोकरीच्या ठिकाणी असणारे व्यक्ती, प्रवासा दरम्यान भेटणारे एसटी कंडक्टर, शेवटी पाहणारे व CCTV फुटेजमध्ये दिसणारे स्थानिक मच्छीमार असे विविध १०४ साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तसेच भरणे नका, खेड येथील CCTV फुटेज व जगबुडी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी वावर असलेल्या महत्वाच्या स्थानिक साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या प्राथमिक पोलीस तपासात घातपाताचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

नीलिमा चव्हाण हिची बॅग हस्तगत करण्यासाठी पोलीसांकडून ऑपरेशन बॅग सर्च सुरू आहे. त्यामध्ये ४ होड्या, २ ड्रोन, Binoculars तसेच ८० पोलीसांची ८ पथकांद्वारे शोध मोहीम सुरू आहे. आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. अशात पोलीस तपास अजूनही सुरू असून साक्षीदारांची कसून चौकशी सुरू आहे.

WHO Alert : भारतात बनवलेल्या कप सिरपमुळे मोठा गोंधळ, WHO ने जारी केला अलर्ट

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here