अपघात कसा घडला?
पुसदहून मुंबईला जाणाऱ्या बसचा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंदळी गावाजवळ अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितूनुसार समोरुन येत असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने बस चालकानं धडक वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एसटी बस पुलावरून खाली घसरून हा अपघात घडल्याचे समजते आहे. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेत काही जण किरकोळ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंभीर प्रवाशांवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार
जालना जिल्ह्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला अपघात झाल्यानंतर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. अपघात स्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अपघात स्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.काही प्रवाशांना जालना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढलेलं आहे.रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यानं आणि रस्त्यांची दुरवास्था असल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनचालकांनी नियमितपणे वाहनांची तपासणी करुन घेऊन वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं.