सोलापूर : माढा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा यांना जबर मारहाण करण्यात आली. माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार मुलीने बापाला प्रियकराच्या मदतीने मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वडाची वाडी येथे हा प्रकार घडला आहे.

पळून जाऊन लग्न करण्यास विरोध होईल. मात्र वडिलांचे पाय तोडले तर त्यांचा अडथळा येणार नाही, असे म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचे पाय तोडण्याचा कट रचला. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला असून पोटच्या मुलीनेच बापाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलगी साक्षी व तिचा प्रियकर आणि त्याचे तीन साथीदार अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

लघुशंकेच्या निमित्ताने मुलीने वाहन थांबवण्यास सांगितले

साक्षी शहा हिचे चैतन्य सोबत प्रेमसंबंध होते. साक्षी ही पुण्याला दुकानाचे साहित्य आणायला गेली होती. सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसने शेटफळ (ता. माढा) येथे आली. तेथून आणण्यासाठी वडील कार घेऊन गेले होते. रस्त्यात वडाची वाडीजवळ लघुशंकेचे निमित्त करून तिने गाडी थांबवण्यास सांगितले. मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांच्या पायावर मारायला सुरुवात केली. डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले.

भावोजी, ताई तुम्हाला संपवणारे; मुंबईतील सराफाला मेहुणीने क्लीप पाठवली, काही दिवसातच…
व्यापारी महेंद्र शहा यांना वडाची वाडीचे उपसरपंच बापू काळे व रामचरण डोंगरे यांनी उपचारासाठी हलवले. या प्रकरणी पाच जणांवर मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाचही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

प्रत्येकी १५ हजार रुपयांची सुपारी

वडिलांना मारण्यासाठी पोटच्या मुलीने चौघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची सुपारी दिली होती. वडिलांना मारण्यासाठी साक्षीने चौघा आरोपींना प्रत्येकी १५ हजार दिले होते. चैतन्य याने गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी व जेवण्यासाठी मारेकऱ्यांना पैसे दिले होते. शेटफळहून माढ्याकडे वडिलांसोबत जात असताना साक्षीने चैतन्यशी ठरल्यानुसार कृती केली.

बायकोसोबत वाद, नवऱ्याने पोटच्या लेकरांना विहिरीत ढकललं, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलीसी खाक्या दाखवताच संशयितांनी तोंड उघडलं. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एका बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. परंतु वडिलांचा विरोध होता. त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा तिने कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

दरम्यान पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महंमद शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here