दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय ३४, रा. वाघोली, ), संदीप किसन जाधव (वय २८, रा. आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत (वय २६, रा. आर्डे, सातारा), सागर अनिल कोळेकर (वय २३, रा. सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय १८ ), शुभम नवनाथ बरकडे ( वय २०), मंगेश रमेश शिंदे, ( वय २१), राहुल बाळासाहेब बरकडे (वय २७, चोघे ही रा. लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर,( वय २३, रा. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ऋतिक उत्तम मोहिते (वय २७, रा. पर्वती दर्शन) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार ऋतिक सेल्समन आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता तक्रारदार आणि त्यांच्या ऑफिसमधील एक तरुणी सेनापती बापट रस्ता येथील स्टार बाजार मार्केट येथे आयसीसी टॉवरजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे एक कार आली. त्यामध्ये सहा ते सात व्यक्ती होत्या. आपण पोलीस असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात जायचे आहे, असे सांगितले आणि त्यांनी या दोघांना जबरदस्तीने धक्काबुक्की करून कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना पाषाणमार्गे चांदणी चौक ते बेंगळुरू हायवेने कात्रज घाटाजवळ घेऊन गेले. तेथे तक्रारदार ऋतिकला मारहाण करुन त्यांनी गाडीतून खाली ढकलून दिले. त्यानंतर ते संबधित तरुणीला घेऊन साताऱ्याच्या दिशेने गेले.
चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या पथकाने आरोपीचा माग काढ करण्यास सुरुवात केली. रविवारी पहाटे साडेतीन वाजता आरोपींना सातारा टोल नाका येथे अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपास सुरू केला. अवघ्या तीन ते चार तासांमध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. अपहरण नक्की कशासाठी करण्यात आले, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती झोन ४ चे उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times