नवी दिल्ली: मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दाखल केलेला मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासांहून अधिक वेळ भाषण करत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांसह काँग्रेस पक्षाचा समाचार घेतला. तसेच मणिपूरमधील हिंसाचारावर देखील मत व्यक्त केले.

मोदींनी मणिपूरमधील जनतेला हे आश्ववासन दिले की संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे आणि लवकरच तेथील परिस्थिती सामान्य होईल. मोदींना आपल्या भाषणात विरोधकांची नवी आघाडी INDIA वर देखील जोरदार हल्ला चढवला. तेव्हा जेव्हा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात तेव्हा तेव्हा एनडीए आणि भाजपसाठी ते शुभ ठरते. काँग्रेस पक्षाकडे स्वत:चे असे काही नाही त्यांनी पक्ष, नाव, चिन्ह सर्व काही चोरले आहे अशी टीका मोदींनी यावेळी केली.

२०२८ साली जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा भारत…; PM मोदींची आणखी एक भविष्यवाणी
मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करताना पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली होती. तसेच मोदींचे भाषण सुरू असताना देखील ते अधून मधून बोलण्याचा प्रयत्न करत होते.

नाव चोरले, इंडियाचे तुकडे केले; मोदींनी काँग्रेससह विरोधकांच्या नव्या आघाडीचा समाचार घेतला
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असा ठराव मांडला की “या सभागृहाने अधीर रंजन चौधरी यांनी जाणीवपूर्वक आणि वारंवार केलेल्या गैरवर्तन करून सभागृहाची अवहेलना केली. अध्यक्षांच्या अधिकाराने त्यांच्या गैरवर्तनाचे प्रकरण समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सभागृहाची विशेषाधिकार समिती आणि समिती अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here