नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. याबाबत मोदी सरकारने अशा सरकारी कर्मचार्‍यांना ओळखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर मोदी सरकार भ्रष्ट आणि अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठीही आग्रह धरत आहे.

केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाचा रेकॉर्ड तपासणार आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. यानुसार अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. जे भ्रष्ट, अकार्यक्षम असल्याचे आढळून येतील त्यांना निवृत्ती घेण्यास सांगितले जाईल. याबाबत, एक रजिस्टरही तयार करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ५० ते ५५ वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासण्यास केंद्र सरकारने सांगितलं आहे. ३० वर्षे पूर्ण झालेल्या किंवा ५०-५५ वर्षे वयाच्या सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवेच्या नोंदीमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

अकाली सेवानिवृत्ती घ्या

कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड परीक्षण केल्यावर निर्णय घेतला जाईल त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. हे कर्मचारी योग्यरित्या काम करत आहेत की जनतेच्या हिताचा विचार करता त्यांना आधीच निवृत्ती दिली जावी, हे ठरवले जाईल. यासोबतच कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले आहे ज्यात या सर्व माहितीची नोंद केली जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here