सातारा: वाघोली (ता. कोरेगाव) येथील सुधांशु प्रमोद रणसिंग या विद्यार्थ्याने खासगी अकॅडमी, क्लासला न जाता घरीच केलेल्या स्वयं अध्ययनाच्या बळावर जेईई (JEE) ऍडव्हान्स परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून नागपूरच्या एनआयटी (NIT) मध्ये अभियांत्रिकीला प्रवेश प्राप्त केला आहे. केंद्र सरकारची एनआयटी, नागपूर म्हणजे काय दर्जा आहे, हे ज्यांना माहिती त्यांना त्याचे महत्व कळेल. विशेष म्हणजे सुधांशुने वाघोलीसारख्या ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्या दरम्यान आयआयटी किंवा एनआयटीतच प्रवेश घ्यायचा हे पक्के ठरवून त्याने शाळेत आणि घरीच अभ्यास करून हे यश प्राप्त केले आहे.
सीएच्या परीक्षेत नाशिकच्या दिशा गुजरानीचा देशात डंका, पहिला क्रमांक पटकावत घातली यशाला गवसणी
केंद्र शासनाच्या अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी केवळ घरी अभ्यास करून प्रवेश मिळवणारा विद्यार्थी लाखात एखादा असू शकेल. त्या लाखात एक हा सुधांशु आहे. लहानपणापासून तो पहिला स्थानी असायचा. अभ्यासात कर्तबगारी दाखवायचीच हे त्याने पक्के ठरवलेलं. त्या निर्धाराने एक महत्वपूर्ण टप्पा त्याने सर केला आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या दोनच संस्था आहेत. एक आयआयटी मुंबई आणि दुसरी एनआयटी नागपूर. आयआयटी असो किंवा एनआयटी इथे प्रवेश म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. अशा संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून खासगी अकॅडमीत प्रवेश घेतात.

चिमुकल्यांच्या जीवाशी क्रूर खेळ; सापांचा धोका, तरी १२ महिने शाळेसाठी सडक्या थर्माकोलवरून प्रवास

सुधांशूने एनआयटीसाठी केवळ घरीच अभ्यास करून आणि घरच्यांना किंचितशी आर्थिक तोशीस न देता स्वतःच्या उज्वल भविष्याचा पाया निश्चित केला आहे. मात्र, तो एवढ्यावर थांबणार नाही, तर एनआयटीमधील शिक्षण काळातही तो प्रत्येक वर्षी चमकत राहणार हे नक्की. त्याची अफाट मेहनत, जिद्द, चिकाटी या जोरावर घरीच स्वयंअध्ययन करून मिळवलेले हे यश अभिनंदन आहे. प्रमोद रणसिंग आणि माया रणसिंग या त्याच्या माता-पित्याची मिळालेली साथही तितकीच कौतुकास्पद आहे. सुधांशुच्या स्वयंअध्ययन, जिद्द आणि चिकाटी ही समाजातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here