मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. राहुल द्रविडसोबत टीम इंडियात आणखी एका मुख्य प्रशिक्षकाचा समावेश झाला आहे. आयर्लंडच्या दौऱ्यावर ते यंग ब्रिगेडसोबत असतील आणि त्यांच्या देखरेखीखाली विजेतेही तयार करतील. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणने त्यांची पोकळी भरून काढली असली तरी बीसीसीआयने यावेळी सितांशु कोटक यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सितांशु कोटक हे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक असणार आहेत. कोण आहेत हे नवे प्रशिक्षक आणि त्यांच्यावर टीम इंडियाची एवढी मोठी जबाबदारी का सोपवण्यात आली, चला जाणून घेऊया.सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांसारखे युवा खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत उंच भरारी घेण्यास तयार असताना सितांशु कोटक टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात होते. पण कोटक यांची दुसरी इनिंग खरोखरच चांगली राहिली आहे. ते ज्या पद्धतीचे फलंदाज होते त्यापेक्षा चांगले प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. कोटक यांची एक चतुर रणनीतिकार अशी प्रतिमा आहे. ज्यांनी आपल्या प्रशिक्षणाखाली सौराष्ट्रला २०२०चा रणजी करंडक चॅम्पियन बनवला.

राहुल द्रविडचे उत्तराधिकारी

या उत्कृष्ट कोचिंग तंत्रामुळेच सितांशु कोटक यांना भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रतिष्ठेचे स्थान मिळाले, जे दिग्गज राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी असणार आहेत. आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक पाहता वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण उदयोन्मुख शिबिरावर देखरेख करण्यात व्यस्त असल्याने, आयर्लंड दौऱ्यावरील ही टी-२० मालिका सितांशु कोटक यांच्या कोचिंग कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरू शकते.

भारताचा आयर्लंड दौरा

१८, २० आणि २३ ऑगस्ट रोजी मलाहाइडमध्ये तीन टी-२० सामने खेळवले जातील. संघाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या बहुप्रतिक्षित पुनरागमनामुळे या मालिकेला खूप महत्त्व असणार आहे. लक्ष्मणने यांनी यापूर्वी भारतीय संघासोबत चीफ ऑफ सपोर्ट स्टाफ म्हणून गेल्या वर्षी आयर्लंडच्या टी-२० दौऱ्यावर तसेच झिम्बाब्वेचा एकदिवसीय दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत प्रवास केला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यावर लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते. भारत आणि आयर्लंड यांच्यात जून २०२२ मध्ये शेवटची दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पाहुण्या संघाने २-० ने मालिका जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here