मुंबईः ‘मला मुव्हि माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय,’ असं ट्विट करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौटला शिवसेना नेते यांनी धारेवर धरल आहे. ‘पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल कर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आणि आपल्या राज्यात जावं,’ या शब्दांत कंगनाला खडे बोल सुनावले आहेत.

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर कंगनानं प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, बी-टाऊनमधील अनेक बड्या कलाकारांवरही कंगनानं आरोप केले होते. आता तर तिनं थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडलं आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं म्हटलं होतं. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको,’ असं ट्विट तिनं केलं होतं.

वाचा:

कंगनाच्या या ट्विटवरून संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या विषयावर गांभीऱ्यांनं दखल घेऊन या लोकांवर कारवाई केली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर, ‘कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी चंबू गबाळ आवरावं आणि आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चालवलाय?,’ असा सवालही त्यांनी केला.

सुशांतप्रकरणी कंगनाला करायचीये मदत

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी काही चॅट व्हायरल झाले होते. या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती ड्रग्ज डिलींग करत असल्याचा दावा केला जात आहे. बॉलिवूड आणि ड्रग्जचा संबंध असल्याचं कंगनानं म्हटलं होतं. बॉलिवूडमधील पार्ट्यांत कोकेन हमखास वापरले जाते. त्यामुळं तिला नारकोटिक्स ब्युरोची मदत करायची आहे पण त्यासाठी तिला संरक्षण हवं असल्याचं, तिनं एक व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे.

त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी, ‘१०० तास आणि चार दिवसांपेक्षा जास्तीचा काळ लोटून गेला. कंगना स्वतः बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांबद्दल सांगायला तयार आहे. पण यासाठी तिला सुरक्षेची गरज आहे. पण महाराष्ट्र सरकारने तिला अजून संरक्षण दिलं नाहीये. असं ट्विट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here