मुंबईः राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनलॉक-४साठी नियमावली जारी केल्या आहेत. अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात प्रवास करण्यासाठी आता ई-पासची अट हद्दपार करण्यात आली आहे. तर, हॉटेल आणि लॉज १०० टक्क्यांच्या क्षमतेनं सुरु राहणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी व बिघडलेली जीवनशैली पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा करण्यात आली. मिशिन बिगिन अगेनच्या टप्प्यात काही काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अनलॉक-४च्या टप्प्यात राज्यात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याचा घेतलेला एक आढावा.

राज्यात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार

>> हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार

>> खासगी आणि मिनी बसला परवानगी

>> अत्यावश्यक सेवेतील दुकाने आधीच्या नियमावलीचे पालन करतील

>> राज्यातील इतर भागांत ५० टक्के कर्माचाऱ्यांना उपस्थित राहण्याची मुभा

>> चालकासह टॅक्सी आणि रिक्षात तीन प्रवाशांना परवानगी

>> खासगी चार चाकी वाहनात चार लोकांना प्रवास करता येणार

>> शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

>> ३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो सेवा बंद

>> सिनेमागृहावरील बंदी कायम

>> सिनेमा हॉल, थिएटर्स, बिअर बार, मनोरंजन पार्कवरील निर्बंध कायम

>> सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही

>> अंत्यविधीसाठी २०पेक्षा अधिक लोकांना येण्याची परवानी नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here