मुंबई: राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संध्या ८ लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत या साथीने आणखी ३२० जणांचा बळी घेतली आहे तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. काहीसा दिलासा म्हणजे आज १० हजार ९७८ रुग्णांनी करोनावर मात केली असून या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. ( )

वाचा:

राज्यात आतापर्यंत ४२ लाख ११ हजार ७५२ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८ हजार ३०६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह तर बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत प्रत्यक्षात १ लाख ९८ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे आजच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यात करोना मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. दैनंदिन नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडाही गेल्या तीन दिवसांपासून १५ हजारच्या वरच आहे.

वाचा:

> आज दिवसभरात १० हजार ९७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.३२ टक्के इतके झाले आहे.

> राज्यात गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२० जणांना प्राणास मुकावे लागले आहे. मृतांचा एकूण आकडा आता २४ हजार ९०३ इतका झाला असून राज्याचा करोना मृत्यूदर सध्या ३.०८ टक्के इतका आहे.

> राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वाधिक ५४ हजार ८५७ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल जिल्ह्यात २० हजार ८६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबईत २० हजार ६७ रुग्ण उपचार घेत आहेत.

> सध्या राज्यभरात १३ लाख ७९ हजार ५१९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार २० व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here