म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचे निर्देश राज्याच्या समाजकल्याण विभागाने दिल्यानंतर शहरात पारंपरिक पद्धतीने नामकरण झालेले रस्ते, चौक, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने रस्ते, चौक तसेच वस्त्या अशी ८१ ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पांरपरिक नावे बदलण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. रविवार कारंजावरील तांबट लेन व तेली गल्ली हे नाव बदलू नये, या आशयाचे पत्र स्थानिकांनी पालिकेला दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

शहरात आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने जातिवाचक नावे गावे, वाड्या, वस्त्या तसेच रस्त्यांना देण्यात आली आहेत. परंतु, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून ती बदलण्याचा निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने मे २०२१ मध्ये कायदा पारित करून राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्‍त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

शहरातील विशेषत: गावठाण भागात मोठ्या प्रमाणात जातिवाचक नावांच्या गल्ल्या व रस्त्यांना नावे देण्यात आली आहेत. शहरात ८१ ठिकाणांची नावे बदलण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. महासभेच्या मंजुरीनंतर विभागीय अधिकाऱ्यांनी नवीन नावे सुचवली. परंतु, या नवीन नावांनाच स्थानिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश पाळायचा की स्थानिकांचे ऐकायचे, अशी अडचण झाली आहे.

साडे तीन कोटींची शिडी भंगारात जाणार, फिनलँडहून खास ‘या’ कामासाठी मागवलेली

तलाठी कॉपीतील उमेदवार पसार

तलाठी भरतीच्या परीक्षेत म्हसरूळ परिसरातील केंद्रात हायटेक कॉपी केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय २८, रा. वैजापूर) याला नाशिक न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याने चुलत बहीण संगिता गुसिंगे हिला ब्ल्यूटूथ व वॉकीटॉकीद्वारे प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या घटनेनंतर परीक्षार्थी संगीता पसार झाल्याने तिच्या मागावर नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

तलाठी पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील एका केंद्रावर पेपर फुटीचा प्रयत्न करण्यात आला. हायटेक स्वरूपात कॉपी करून पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याने तिघांवर म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संशयित गणेश गुसिंगेसह सचिन नायमाने आणि संगीता रामसिंग गुसिंगे यांचा समावेश आहे. मुख्य संशयित गणेश अट्टल गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही अनेकदा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची एक टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गंभीर बाब म्हणजे, म्हाडा आणि वनरक्षक भरतीमध्येही त्यांनी गैरप्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, संशयित गणेशला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची बहीण मात्र पसार झाली. त्यामुळे पोलिसांनी त्वरित तिच्या शोधासाठी पथक मार्गस्थ केले आहे.

नाशिककरांना निओ मेट्रोचं फक्त गाजर; मुदत संपत आली तरी नारळ फुटेना, कुठं अडलं घोडं?

गुन्हे, अवैध धंदे रोखण्यासाठी हेल्पलाइन

नाशिक ग्रामीण पोलिस दलाने हेल्पलाइनद्वारे माहिती संकलित करून अवैध धंद्यांचे निर्मूलन केल्यानंतर आता शहर आयुक्तालयाने त्याबाबत पाऊल उचलले आहे. अपघात, वाहतूक, गुन्हे, अवैध धंदे याबाबतची माहिती थेट आयुक्तालयापर्यंत पोहोचविता येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाशिककर आता आयुक्तालयाच्या ‘खबरी’च्या भूमिकेत असणार आहेत.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणि वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारींसह शहरातील गैरकृत्यांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता येणार आहे. व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोटो, व्हिडीओ आणि मेसेज पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामध्ये केवळ शहरातील गुन्हेगारी, वाहतूक, अपघात व अवैध धंदे याबाबत सूचना व माहिती पाठवावी. इतर मेसेज पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यासह ठोस कारवाईसाठी संबंधित ठिकाणाचा पत्ता, लोकेशन व अन्य उपयुक्त माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या गुप्त माहितीमुळे संशयितांचे धाबे दणाणणार आहे.

तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघड, एकजण ताब्यात

व्हॉट्सअॅप क्रमांक : ८२६३९९८०६२

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सात महिन्यांपासून हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. त्यातून हाती आलेल्या माहितीनुसार डोंगरदऱ्यांमध्ये शिरून पथकांनी कारवाई केली. यानंतर आता नुकतीच ‘बळीराजा’ ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनीही भूमिका घेतल्याने नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. यापूर्वीही शहरात या स्वरूपाचा प्रयोग तत्कालीन पोलिस आयुक्तांनी राबविला होता. त्यामाध्यमातून अनेक गुन्ह्यांसह तक्रारींची उकल झाली. आता पुन्हा त्याची अंमलबजावणी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here